युद्ध...
सांगा मजला युद्धाने काय साधले
देश बुडाले उद्ध्वस्तच झाले.
||धृ||
शतकांचे संचित जळून गेले
संस्कृती चे कापही नुरले.
रस्तो रस्ती फिरत रहाती
ओळख पुसले चेहरे.||१||
घरे पडता मने कोळपली
अश्रूतर थिजून गेले
गतस्मृतींच्या आठवणींना
कवटाळून बसणे उरले.||२||
कोण फुंकितो शंख रणीचा
भाले फेकी मारी कोणी.
दोन्ही पक्षांत उरती
पार्थिवांच्या गोणी. ||३||
विजयी कोणी परास्त कोणी
कोण लिहीतो अभद्र वाणी.
लल्लाटीच्या भयाणरेषा
वाचू न शकतो कोणी.||४||
डॉ. सदानंद चावरे
२६-०२-२०२२
No comments:
Post a Comment